स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह !
' मी भविष्यात डोकावण्याचा खटाटोप करत नाही . त्याची मला जरूरच वाटत नाही . मात्र एक उज्वल दृश्य मला स्पष्टपणे दिसत आहे . ती चिरपुरातन मातृदेवता पुनरपि जागी झाली आहे . आपल्या श्रेष्ठ सिंहासनावर ती आरूढ झाली आहे आणि सर्वगौरवाने तळपत आहे . '
हे उद्गार आहेत स्वामी विवेकानंदांचे . भारतमातेला जगाच्या सिंहासनावर पुनः आरूढ करण्यासाठी कृत संकल्प झालेल्या महापुरुषाचे . स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ या दिवशी पौष कृष्ण सप्तमी शके १७८५ ला कोलकाता येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरीदेवी असे होते . सर्वजण त्याला ' बिले ' असे म्हणत .लहानपणी बिले खूपच खोडकर होता . दंगामस्ती करायला, कोणतेही कठीण काम करायला तो नेहमीच पुढे असे . वडीलधारया माणसाना तर तो नेहमी विविध प्रश्न विचारून भंडावून सोडे . हि मस्ती नव्हती, ती होती त्यांच्या भावी कार्याची बीजे .
आपले शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी समाजाची सेवा करण्याचा निश्चय केला . त्याकाळी दक्षिणेश्वरी असलेल्या कालीमातेच्या मंदिरात स्वामी रामकृष्ण पूजा करीत असत . त्यांना परमेश्वरी साक्षात्कार झाला होता . बिलेने त्यांची भेट घेतली आणि जिवाशिवाची जोडी जुळली . विवेकानंद भारतभ्रमण करायला बाहेर पडले . ' करतल भिक्षा तरुतल वास ' करीत करीत ते कन्याकुमारीला आले . भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या दगडावर, श्रीपाद शिलेवर ते ध्यानस्थ बसले . गरिबी, अज्ञान, अशिक्षा यांनी पीडित झालेल्या भारताचे दर्शन घडले त्यांना . त्यांनी निश्चय केला माझे संपूर्ण जीवन मी भारतमातेच्या सेवेला वाहीन .
अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्मपरिषद भरली होती . स्वामी विवेकानंदांचे तेथे झालेले छोटेसे भाषण त्यांना जागतिक कीर्ती देऊन गेले . तत्कालीन युरोपीय जगताचे ते आध्यात्मिक ब्रेंड एंबेसेडर बनले . उच्चभ्रू लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचू लागले . युरोपियन समुदायाच्या मोहमयी विश्वात राहूनसुद्धा स्वामीजींचे लक्ष होते भारताकडे . भारताच्या पुनरुत्थानाकडे !
स्वामीजी भारतात परतले . भारताच्या जागृतीचे काम त्यांनी सुरु केले . तरुणांना आवाहन करताना ते म्हणतात, ' जे सुकुमार आहे; शक्तीपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे तेच परमेश्वराजवळ जाते असे वेदवचन आहे . म्हणून उठा ! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा क्षण हाच आहे . जोपर्यंत तुम्हामध्ये तारुण्याची तडफ आहे, जोवर तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले असे झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तोपर्यंत निश्चय करा ! उठा, काम करा !नुकतेच उमललेले, न हाताळलेले, वास न घेतलेले पुष्पच ईश्वराच्या चरणी अर्पण करायचे असते ! हीच ती शुभ घडी आहे . '
दुसऱ्याला केवळ दोष देणे किवा रडत बसणे विवेकानंदांना मान्य नव्हते . ' एखाद्या खोलीत शतकानुशतके अंधार आहे . तिथे आपण गेलो आणि रडत बसलो, ' किती बरे अंधार हा, किती बरे अंधार हा ! ' असे रडल्याने अंधार जाईल का ? प्रकाश आणा नि तत्क्षणी अंधार नाहीसा होईल ! हेच तत्व मनुष्य-सुधारणेमागे आहे . या देशाचे आध्यात्मिक पुनरुत्थान करण्याचा हाच मार्ग आहे . परस्परांशी भांडण करणे वा लोक जे करीत आहेत त्यावर टीकास्त्र सोडणे यातून काहीच साधणार नाही . त्यांच्यापुढे चांगले तेवढे ठेवा . पहा किती उत्सुकतेने ते त्याचा स्वीकार करतील ! सर्व वंश जागृत होऊन उभा राहील आणि बाहु उभारून जे श्रेष्ठ आहे - तेजस्वी आहे त्याचा स्वीकार करील ! '
भारताचा विकास म्हणजे भारतातील सामान्य माणसाचा विकास यावर स्वामीजींचा विश्वास होता . त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. धर्म, शिक्षण, आरोग्य, सेवा यांचा प्रसार केला . ते म्हणाले , ' हे राष्ट्र उभे राहाणार ते कोणातून ? भंगी आणि चांभार यांच्यातून ! कोळ्यांच्या झोपड्यांतून नि शेतकऱ्यांच्या खोपट्यातून ! या नव्या भारताचे चैतन्य उसळणार आहे कुंभाराच्या भट्टीतून आणि वाण्याच्या दुकानातून ! याचे स्फुरण आहे कारखाने आणि बाजारपेठातून ! वनांतून आणि वनरायामधून . डोंगरदऱ्यामधून !
यंदा स्वामी विवेकानंदांच्या जन्माला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत . आज जग मोठ्या संभ्रमित अवस्थेत आहे . युरोपीय प्रगतीचा फुगा फुटण्याच्या अवस्थेत आहे . जगाला त्याने विनाशाच्या उंबरठ्यावर आणले आहे . अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्य संपूर्ण सामाजिक पारतंत्र्याला कारणीभूत होत आहे . आणि अशा परिवर्तन बिंदूवर स्वामीजींची सार्धशती आली आहे . स्वाभाविक जग आज भारताकडे मोठ्या आशेने पहात आहे .
भारत आज सर्वाधिक तरुण युवा असलेला देश आहे . हे युवा आपला देश, इतिहास, संस्कृती जाणून घेऊ इच्छिणारे ! भारताविशी गंभीर असणारे ! सेवेचा संदेश ज्यांना आकर्षित करतो असे ! स्वामीजींनी म्हटले होते, ' पावित्र्याच्या तेजाने तळपणारे , ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले , मृगेन्द्राचे सामर्थ्य नसात स्फुरत असलेले , दीनदलितांबद्धल हृदयात अपार करुन असलेले सहस्रो युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन ते करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल ! '
सार्धशतीच्या निमित्ताने आपण जगाला एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहोत . जेथे मतभेद आहेत तेथे कार्याबद्धल अनुकुलता निर्माण करणे . जेथे अनुकुलता आहे तेथे शक्ती संपादन करणे . जेथे कार्यशक्ती आहे तेथे ती अधिक प्रभावी करणे . ज्या क्षेत्रात अजून प्रवेश झालेला नाही तेथे कार्याचा विस्तार करणे . असा हेतू ठेऊन काम करतो आहोत . युवा, महिला, प्रबुद्ध वर्ग, ग्रामवासी व जनजाती अशा विविध आयामांनी समाजाच्या सर्व थरांपर्यंत जात आहोत . स्वामीजी प्रमाणेच धर्म व देशविषयक श्रद्धेला जागवित आहोत .
आपल्या देशात वनांचलात काम करणाऱ्या संस्था आहेत . समाजाच्या पुनरूत्थानाचे काम अत्यंत प्रभावीरीत्या करण्याचे कार्य त्या करीत आहेत . त्यांना अधिक सक्रिय करणे, या कार्यातील त्यांचा सहभाग वाढविणे आपण करणार आहोत .अळब्यासारख्या संस्था काढून समाजविघातक उपद्व्याप करणाऱ्यांना साहजिकच चाप बसणार आहे . समाज कार्यात जनजाती प्रमुखांचा सहभाग वाढविणे, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करणे यासाठी विचारविनिमय-परिसंवादात्मक कार्यक्रमांची आखणी आपण करणार आहोत .
शिक्षण हा समाजाचा पाया . तो बलवान व्हायलाच हवा . यासाठी यावर्षी शिक्षण संस्थांचे कार्य आपण गतिमान करतो आहोत . त्याची व्याप्ती वाढविणे, वसतिगृहात विवेकानंदांच्या प्रतिमेचे अनावरण करणे, त्यांच्या विचारांचे व्याख्यान ठेवणे, वसतिगृहाची संख्या वाढविणे . ती अधिक कार्यक्षम करणे असे उद्देश्य ठरवून आपण काम करणार आहोत .
स्वास्थ्यविषयक विचार करताना चिकित्सा शिबिरांचे आयोजन करणे . तालुका स्तरावर कबड्डी , खोखो आदि खेळांच्या स्पर्धा घडविणे . महिलांसाठी समूह नृत्याचे आयोजन करणे . अशा विविध अंगांनी काम करण्याचा प्रयत्न या वर्षी आपण करीत आहोत . स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलेय, ' उत्साहाने हृदय भरून घ्या आणि सव ठिकाणी व्यापून जा. नेतृत्व करताना सर्वांचे दास व्हा, निःस्वार्थी व्हा आणि कधी एखाद्या मित्राला दुसऱ्याची त्याच्या पाठीमागे निंदा करताना ऐकू नका . '
' मी भविष्यात डोकावण्याचा खटाटोप करत नाही . त्याची मला जरूरच वाटत नाही . मात्र एक उज्वल दृश्य मला स्पष्टपणे दिसत आहे . ती चिरपुरातन मातृदेवता पुनरपि जागी झाली आहे . आपल्या श्रेष्ठ सिंहासनावर ती आरूढ झाली आहे आणि सर्वगौरवाने तळपत आहे . '
हे उद्गार आहेत स्वामी विवेकानंदांचे . भारतमातेला जगाच्या सिंहासनावर पुनः आरूढ करण्यासाठी कृत संकल्प झालेल्या महापुरुषाचे . स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ या दिवशी पौष कृष्ण सप्तमी शके १७८५ ला कोलकाता येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरीदेवी असे होते . सर्वजण त्याला ' बिले ' असे म्हणत .लहानपणी बिले खूपच खोडकर होता . दंगामस्ती करायला, कोणतेही कठीण काम करायला तो नेहमीच पुढे असे . वडीलधारया माणसाना तर तो नेहमी विविध प्रश्न विचारून भंडावून सोडे . हि मस्ती नव्हती, ती होती त्यांच्या भावी कार्याची बीजे .
आपले शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी समाजाची सेवा करण्याचा निश्चय केला . त्याकाळी दक्षिणेश्वरी असलेल्या कालीमातेच्या मंदिरात स्वामी रामकृष्ण पूजा करीत असत . त्यांना परमेश्वरी साक्षात्कार झाला होता . बिलेने त्यांची भेट घेतली आणि जिवाशिवाची जोडी जुळली . विवेकानंद भारतभ्रमण करायला बाहेर पडले . ' करतल भिक्षा तरुतल वास ' करीत करीत ते कन्याकुमारीला आले . भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या दगडावर, श्रीपाद शिलेवर ते ध्यानस्थ बसले . गरिबी, अज्ञान, अशिक्षा यांनी पीडित झालेल्या भारताचे दर्शन घडले त्यांना . त्यांनी निश्चय केला माझे संपूर्ण जीवन मी भारतमातेच्या सेवेला वाहीन .
अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्मपरिषद भरली होती . स्वामी विवेकानंदांचे तेथे झालेले छोटेसे भाषण त्यांना जागतिक कीर्ती देऊन गेले . तत्कालीन युरोपीय जगताचे ते आध्यात्मिक ब्रेंड एंबेसेडर बनले . उच्चभ्रू लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचू लागले . युरोपियन समुदायाच्या मोहमयी विश्वात राहूनसुद्धा स्वामीजींचे लक्ष होते भारताकडे . भारताच्या पुनरुत्थानाकडे !
स्वामीजी भारतात परतले . भारताच्या जागृतीचे काम त्यांनी सुरु केले . तरुणांना आवाहन करताना ते म्हणतात, ' जे सुकुमार आहे; शक्तीपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे तेच परमेश्वराजवळ जाते असे वेदवचन आहे . म्हणून उठा ! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा क्षण हाच आहे . जोपर्यंत तुम्हामध्ये तारुण्याची तडफ आहे, जोवर तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले असे झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तोपर्यंत निश्चय करा ! उठा, काम करा !नुकतेच उमललेले, न हाताळलेले, वास न घेतलेले पुष्पच ईश्वराच्या चरणी अर्पण करायचे असते ! हीच ती शुभ घडी आहे . '
दुसऱ्याला केवळ दोष देणे किवा रडत बसणे विवेकानंदांना मान्य नव्हते . ' एखाद्या खोलीत शतकानुशतके अंधार आहे . तिथे आपण गेलो आणि रडत बसलो, ' किती बरे अंधार हा, किती बरे अंधार हा ! ' असे रडल्याने अंधार जाईल का ? प्रकाश आणा नि तत्क्षणी अंधार नाहीसा होईल ! हेच तत्व मनुष्य-सुधारणेमागे आहे . या देशाचे आध्यात्मिक पुनरुत्थान करण्याचा हाच मार्ग आहे . परस्परांशी भांडण करणे वा लोक जे करीत आहेत त्यावर टीकास्त्र सोडणे यातून काहीच साधणार नाही . त्यांच्यापुढे चांगले तेवढे ठेवा . पहा किती उत्सुकतेने ते त्याचा स्वीकार करतील ! सर्व वंश जागृत होऊन उभा राहील आणि बाहु उभारून जे श्रेष्ठ आहे - तेजस्वी आहे त्याचा स्वीकार करील ! '
भारताचा विकास म्हणजे भारतातील सामान्य माणसाचा विकास यावर स्वामीजींचा विश्वास होता . त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. धर्म, शिक्षण, आरोग्य, सेवा यांचा प्रसार केला . ते म्हणाले , ' हे राष्ट्र उभे राहाणार ते कोणातून ? भंगी आणि चांभार यांच्यातून ! कोळ्यांच्या झोपड्यांतून नि शेतकऱ्यांच्या खोपट्यातून ! या नव्या भारताचे चैतन्य उसळणार आहे कुंभाराच्या भट्टीतून आणि वाण्याच्या दुकानातून ! याचे स्फुरण आहे कारखाने आणि बाजारपेठातून ! वनांतून आणि वनरायामधून . डोंगरदऱ्यामधून !
यंदा स्वामी विवेकानंदांच्या जन्माला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत . आज जग मोठ्या संभ्रमित अवस्थेत आहे . युरोपीय प्रगतीचा फुगा फुटण्याच्या अवस्थेत आहे . जगाला त्याने विनाशाच्या उंबरठ्यावर आणले आहे . अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्य संपूर्ण सामाजिक पारतंत्र्याला कारणीभूत होत आहे . आणि अशा परिवर्तन बिंदूवर स्वामीजींची सार्धशती आली आहे . स्वाभाविक जग आज भारताकडे मोठ्या आशेने पहात आहे .
भारत आज सर्वाधिक तरुण युवा असलेला देश आहे . हे युवा आपला देश, इतिहास, संस्कृती जाणून घेऊ इच्छिणारे ! भारताविशी गंभीर असणारे ! सेवेचा संदेश ज्यांना आकर्षित करतो असे ! स्वामीजींनी म्हटले होते, ' पावित्र्याच्या तेजाने तळपणारे , ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले , मृगेन्द्राचे सामर्थ्य नसात स्फुरत असलेले , दीनदलितांबद्धल हृदयात अपार करुन असलेले सहस्रो युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन ते करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल ! '
सार्धशतीच्या निमित्ताने आपण जगाला एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहोत . जेथे मतभेद आहेत तेथे कार्याबद्धल अनुकुलता निर्माण करणे . जेथे अनुकुलता आहे तेथे शक्ती संपादन करणे . जेथे कार्यशक्ती आहे तेथे ती अधिक प्रभावी करणे . ज्या क्षेत्रात अजून प्रवेश झालेला नाही तेथे कार्याचा विस्तार करणे . असा हेतू ठेऊन काम करतो आहोत . युवा, महिला, प्रबुद्ध वर्ग, ग्रामवासी व जनजाती अशा विविध आयामांनी समाजाच्या सर्व थरांपर्यंत जात आहोत . स्वामीजी प्रमाणेच धर्म व देशविषयक श्रद्धेला जागवित आहोत .
आपल्या देशात वनांचलात काम करणाऱ्या संस्था आहेत . समाजाच्या पुनरूत्थानाचे काम अत्यंत प्रभावीरीत्या करण्याचे कार्य त्या करीत आहेत . त्यांना अधिक सक्रिय करणे, या कार्यातील त्यांचा सहभाग वाढविणे आपण करणार आहोत .अळब्यासारख्या संस्था काढून समाजविघातक उपद्व्याप करणाऱ्यांना साहजिकच चाप बसणार आहे . समाज कार्यात जनजाती प्रमुखांचा सहभाग वाढविणे, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करणे यासाठी विचारविनिमय-परिसंवादात्मक कार्यक्रमांची आखणी आपण करणार आहोत .
शिक्षण हा समाजाचा पाया . तो बलवान व्हायलाच हवा . यासाठी यावर्षी शिक्षण संस्थांचे कार्य आपण गतिमान करतो आहोत . त्याची व्याप्ती वाढविणे, वसतिगृहात विवेकानंदांच्या प्रतिमेचे अनावरण करणे, त्यांच्या विचारांचे व्याख्यान ठेवणे, वसतिगृहाची संख्या वाढविणे . ती अधिक कार्यक्षम करणे असे उद्देश्य ठरवून आपण काम करणार आहोत .
स्वास्थ्यविषयक विचार करताना चिकित्सा शिबिरांचे आयोजन करणे . तालुका स्तरावर कबड्डी , खोखो आदि खेळांच्या स्पर्धा घडविणे . महिलांसाठी समूह नृत्याचे आयोजन करणे . अशा विविध अंगांनी काम करण्याचा प्रयत्न या वर्षी आपण करीत आहोत . स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलेय, ' उत्साहाने हृदय भरून घ्या आणि सव ठिकाणी व्यापून जा. नेतृत्व करताना सर्वांचे दास व्हा, निःस्वार्थी व्हा आणि कधी एखाद्या मित्राला दुसऱ्याची त्याच्या पाठीमागे निंदा करताना ऐकू नका . '