आज भाद्रपद कृष्ण षष्ठी. नेवाशात आज युगांतरीची धामधूम चालली होती.
श्रीमोहीनिराजांचे देवालय माणसांनी ओसंडून वाहत होते. आज ज्ञानेश्वरीची लेखनसीमा !
ज्ञानेश्वर थांबले. सच्चीतानंदबाबांनी लेखणी खाली ठेवली.
सगळ्यांचे चेहरे आनंदाने ओसंडून वाहत होते. कृतकृत्यतेचा क्षण होता तो.
आता काय ? ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिलीय ज्ञानदेवांनी !
ज्ञानेश्वरांची मिरवणूक काढायची काय ?
समाजाच्या उत्साहाला उणे काय असणार ! साधी नाही अंबारीतून मिरवणूक काढायची.
लगबग सुरु झाली. सजवलेला हत्ती आणला गेला. देवालयाच्या प्रांगणात उभा राहिला.
लोकांनी ज्ञानराजांना अंबारीत बसण्याची विनंती केली.
ज्ञानेश्वरांनी नकारार्थी मान हलविली.
लोक आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, ' मग मिरवणूक नाही काढायची ? '
ज्ञानेश्वर उद्गारले, " अरे, मिरवणूक काढायची तर ! उत्साहात काढायची.
टाळ मृदुंगाच्या गजरात काढायची. पण त्यात मी नाही बसणार !
अंबारीत बसणार भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी "