Saturday, April 25, 2020

वन्दे मातरम - एक धगधगते इतिहासपर्व

         वन्दे मातरम - एक धगधगते इतिहासपर्व 

     होय ! बरोब्बर शंभर वर्षे झाली आज त्या घटनेला ! लायलपूर जिल्ह्यातील बंगा गांव . सरदार किशनसिंह आपल्या मुलाला बेटा भगतला घेऊन आमराईत आले होते . कामगार काम करत होते . आमराई तयार करण्याचे काम चालले होते . छोट्या भगतला एका झाडाखाली खेळायला सोडून ते कामाची पाहणी करत ते फिरू लागले .  काही वेळाने त्याचे लक्ष भगतकडे गेले . भगत जमिनीमध्ये छोटे छोटे खड्डे करून आंब्याची पाने जमिनीत पुरत होता .  कुतूहलाने किशनसिंहनी भगतला विचारले, " क्या कर रहे हो भगत ? " ओठ पिळले तर अजूनही दुध निघेल असा तो आठ वर्षांचा बालक बोलता झाला, " पिताजी, बंदुके बो रहा हूं । " 
     वन्दे मातरम ! भारताचे राष्ट्रगीत !  भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील  धगधगती मशाल ! लक्षावधी तरुणांना स्वातंत्र्य यज्ञाच्या बलीवेदीची  
                            नको स्थान मज बहुमानाचे 
                                 कंठावरचे, शीर्षावरचे 
                           कनकमण्यांचे, चकाकण्यांचे 
                             तुझ्या पदींचा घुंगुरवाळा 
                               राष्ट्रदेवी मज कर ना ।
     
     

रोमांच ! होय अक्षरशः काटाच उभा राहिला अंगावर ! आणि का नाही उभा राहणार ? प्रत्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते . आणि आम्ही ऐकत होतो . याची देही याची डोळा अनुभवलेला अद्बूत प्रसंग . अविस्मरणीय क्षण . भारतीय स्वातंत्र्योत्तर लढ्याचे एक लखलखते तेजस्वी पान .
     आझाद हिंद सेनेने स्वातंत्र्य युद्धाचे एक सोनेरी पान लिहिले होते . आपण कोहीमाला गेलो  तर तेथे तो स्तंभ आपल्याला दिसत असतो  . त्यावरील ओळी दिसत असतात . आपण वाचत जातो . त्या काळात प्रवेश करीत जातो . आणि आपला पुरुषार्थ  लख्खपणे समोर उभा रहातो.
When you go home,
Tell them of us and say.
For your tomorrow,
We gave our today.
     दोन ऑगस्ट ची पहाट .  झुंजूमुंजू झालेले न झालेले ! वापिचे रेल्वे स्टेशन . सुनसान, कोणीही नसलेले . डोळ्यात बोट घातले तरी काळोखालाही न दिसणारा अंधार ! आणि ढगाचे जणू दोन तुकडे झाल्याप्रमाणे धो धो कोसळणारा पाऊस ! सोबतीला विजांचे रौद्र संगीत ! भीषण ! भयप्रद !
     लहानशी शिट्टी जाणवेल न जाणवेल अशी . धुराचा लोट पावसात मिसळत रेल्वे आली . थांबली . खाणाखुणा झाल्या आणि  काहीजण दबत दबत रेल्वेत मिसळले . आपापली शस्त्रे सांभाळत . कोसळणाऱ्या पावसालाही कळू न देता .
      १९५४ भारत स्वतंत्र होऊन सात वर्षे झालेली . ब्रिटीश निघून गेलेले .  पाठोपाठ फ्रेन्चांनीही गाशा गुंडाळलेला . पण पोर्तुगिज गोचीडा सारखे डसलेले . भारतमातेचे रक्त शोषण्यात धन्यता मानलेले . हे गोचीड उपटायचे . मुळासकट फेकून द्यायचे . ४९१ स्क्वेअर  मिटरांचा हा भारतीय प्रदेश मुक्त करायचा . आणि म्हणूनच हा दादरा व नगर हवेली लढा . आझाद गोमंतक दल आणि देशभक्त भारतीय यांचा सशस्त्र मुक्तीसंग्राम.
     लवेच्या गावी हेमवंतीबाई नाटेकर यांच्या वडिलांचा आश्रम होता . नाना काजरेकर व राजा वाकणकर तिथे गेले . त्यानी गुप्तपणे माहिती काढायला सुरुवात केली . २ माशिनगन्स, ६ स्टेनगन्स, २०० रायफल्स व सोबतीला भरपूर दारुगोळा असलेले सिंहवास, सेल्वासा ठाणे . विरुद्ध गावठी शस्त्रे घेतलेली पण प्रखर देशभक्तीने भरलेली १०७ मने . मनात एकच संकल्प . सावरकरांच्या शब्दांचा ' हे काय बंधू असतो जरी सात आम्ही । त्वस्थडीलीच दिधले असते बळी मी । ' विजय कोणाचा ?  शस्त्रांचा की देशभक्तीचा ?
 युद्धाचे काही संकेत असतात . पुढे नाही जाता आले तरी आहे तेथे दृढ टिकून राहायचे . मोर्चा सोडायचा नाही . आम्ही तसेच केले . आणि ' यलो पिंपळ ' वरून आम्ही चिन्यांना हुसकून लावू शकलो . आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ठाणे आम्ही तोफखान्याची मदत न घेता जिंकले . बिरबल म्हणत असे ' शस्त्र कोणते श्रेष्ठ ? जे वेळेवर हाती मिळेल ते ! '  ' नेपोलियन नेहमी सांगे ' युद्धात शस्त्र लढत असते, पण त्यापेक्षा खरे लढते ते मन, हृदय ! ' मला कवीच्या त्या फुलाची आठवण आली  
मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।।
   आम्ही रांगेत उभे राहिलो . आपला भारतीय तिरंगा वर चढविला . वारा वाहत होता . ध्वज फडकत होता . तन मन धन पूर्वक आम्ही गर्जत होतो . भारतमाता की जय ! भारतमाता की जय ! ! ! 

No comments:

Post a Comment