Thursday, October 6, 2011

विजयादशमी !

आज विजयादशमी !
भगवान श्रीरामांचा रावणावर विजय मिळविलेला दिवस.
रावणाचा संहार करणारे राम प्रचंड पराक्रमी होते.

सीतेला सोडवून आणण्यासाठी राम लंकेत जात होते.
समोर प्रचंड  हिंदू महासागर पसरलेला.
आपल्याला वाट दे अशी विनती रामाने  त्या सागराला केली.
तीन दिवस झाले. सागर ऐकत नाही. राम रागावले.
' विनती ऐकत नाही काय ? आता तुला अटवूनच टाकतो. '
आपला विजयाकांशी बाण त्यांनी धनुष्यावर चढवला आणि.....
सागर समोर साक्षात प्रगट झाला.

No comments:

Post a Comment