Thursday, August 18, 2011

तर लोकपालाची गरजच नव्हती !

सकाळची वेळ ! शिबू विद्यालयात गेला होता.
उठणे, नाश्ता, तयार होणे, नेहमीपेक्षा जास्त सतावले आज शिबुने.
वडिलांना  सांगायचे आज. 
पण मग मस्ती मुलांनी नाही करायची मग कोणी ?  

आई शिबुच्या खोलीत गेली. अस्ताव्यस्त पडलेला  पसारा आवरू लागली.
अकस्मात आईचे लक्ष त्याच्या कपाटाकडे गेले. कपाटातून मुंग्या येत होत्या.
आईने कपाट उघडले. शिळ्या झालेल्या पाचसहा चपात्या पुस्तकांमागे लपल्या  होत्या.
मुंग्या त्या चपात्यांना लागल्या होत्या .

शिबू शाळेतून आल्यावर आईने त्याला विचारले.
शिबू खरे सत्य बोलायचा. गहिवरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला., 
" आई तू रोज मला चपात्या द्यायचीस ना.
त्यातील दोन चपात्या मी त्या समोरच्या आईला ( भिकारणीला ) देत असे.
गेले दोन दिवस ती दिसतच नाहीये. कुठे गेली असेल ग ती ? "

आईने त्याच्या पाठीवरून हात फिरविला.
आपली  रेशमी शाल त्या भिकारणीच्या अंगावर टाकून स्वतः उघडा पडणारा
शिबू तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. टचकन दोन कढत अश्रू शिबुवर पडले.

सत्याचे प्रयोग करणारे  गांधी  सत्याला चिकटून जनभावनेला मान देते ,
शिबू ( सुभाषचंद्र बोस ) कॉंग्रेसचे  अध्यक्ष झाले  असते तर..........
लोकपाल विधेयकाची गरज पडली असती काय ?

No comments:

Post a Comment